बिहारच्या रामगड जिल्ह्यातील कैमूर तालुक्यातील ही घटना. जमुरना गावातील लेकधनींंच्या आयुष्यातील ही चित्तरकथा. शाळा शिकण्यासाठीच पुर्या आयुष्याची जोखीम पत्करून जमुरना गावाच्या या लेकीबाळी दुर्गावती नदीतून शाळेला जातात. शाळेला जाणार्या प्रत्येकीच्या वाट्याला आलेली ही जोखीम. ऋतू कोणताही असो पावसाळा, हिवाळा किंवा उन्हाळा धोका कुणाला टळला नाही. सकाळ झाली की घराचं आवरून गावातील प्रत्येक लेकधन नावेत येऊन थांबते. गावातील सार्या पोरी जमल्या की, मग यांचा शाळेकडे जाण्याचा प्रवास सुरू होतो. जीव मुठीत धरून त्या दुर्गावती नदी पार करतात, आणि काठावर आल्या की हुश्श! करून श्वास सोडत पुन्हा मग शाळेचा रस्ता धरतात. २०१६ मध्ये ही नाव पाण्यात बुडाली होती, पण रोज याच नावेतून जाणार्या पोरी पाण्यातून पोहत सहीसलामत बाहेर पडल्या. उद्या पुन्हा हाच खेळ म्हणत दुसर्या दिवश बोटीमध्ये पुन्हा हजर.
शाळेत नाव दाखल झालंं की जमुरना गावातील प्रत्येकाचा हा शाळेसाठीचा संघर्ष. सध्याची मुलांंना आता दुचाकी आहेत. म्हणून कालांंतरानंं पोरंं दुचाकीनंं शाळेत जाऊ लागतात. पोरींंच्या आयुष्याती ही नाव शाळा संंपेपर्यंंत वाट्याला हेच. कैमूर तालुक्याच्या ठिकाणी, जवळच्या गावांना जाण्या येण्यासाठीही याच नावेचा आधार. ज्यांच्याजवळ वाहने आहेत ते सहज जाऊन येतात मात्र ज्यांच्याकडे वाहने नाहीत असे नागरिक, शाळकरी मुले मुली मात्र दुर्गावती पात्रातून नावेतून वाट काढत आपली पुढची वाट चालू लागतात.
जमुरनातून दुर्गावती नदी पार केली चौरसिया गावाचे अंतर कमी होते. गावातील ८० टक्क्यांंपेक्षा जास्त लोकांची जमीन नदी पलिकडे आहे. मग नदीपार केल्याशिवाय इथल्या शेतकर्यांनाही शेती करायला मिळत नाही. पावसाळ्याच्या दिवसात शेतकरी, शाळकरी मुलं पाऊस जाण्याची वाट बघतात. मुसळधार पावसात दुर्गावती दुथडी भरून वाहते. यावेळी सगळ्यांचे व्यवहार सगळे ठप्प होतात, बंद होतात, शाळा चुकते आणि नुकसान होते. येथील अनेक पोरींना शिकून मोठं व्हायचय, बदल करायचे आहेत आणि आपल्या गावाला जोडणारा एक रस्ताही बनावयाचा आहे म्हणून आम्ही आता नावेतून शाळेला जातो असं त्या हसत हसत बोटीतून उतरताना सांगतात.
No comments:
Post a Comment