रजनीकांत तामीळ जन
तेला आपला वाटणारा, हक्काचा असा अभिनेता. आता तो राजकारणात प्रवेश करतो आहे. तशी घोषणा त्यांनी काही दिवसापूर्वी केली आहेच. ते इतर कुठला राजकीय पक्षात प्रवेश करणार नाहीत तर आपला स्वतंत्र पक्षच काढणार आहेत.
दक्षिण भारतातील सामान्य माणसांना रजनीकांत म्हणजे देव वाटतो. चित्रपटातील अनेक स्टाईल त्याच्या प्रसिध्द आहेत.
एकादा सामान्य कारपेंटर दक्षिणेतील सुपरस्टार बनला या गोष्टीवर खुद्द रजनीकांतसुध्दा कधी विश्वास ठेवणार नाही. मात्र तसे रजनीकांतच्या आयुष्यात झाले आहे. आजचा सुपरस्टार रजनीकांत सार्यांना दिसत असला तरी तो काही एका दिवसात घडला नाही, किंवा एका सिनेमानंतर तो लगेच सुपरस्टार झाला असं झालं नाही, कधी बस कंटक्टर, कधी कारपेंटर तर कधी मिळेल ते काम करून रजनीकांत सुपरस्टार झाला आहे.
नाटक, सिनेमांची आवड रजनीकांत यांना होतीच, मात्र त्यावेळी त्यांना पैशाचीही टंचाई होती. या सगळ्यात त्यांनी कधी आपल्यातला कलाकार मरू दिला नाही. पैशाची चणचण असतानाही त्यांनी मग मद्रासच्या फिल्म इन्सिट्यूटमध्ये प्रवेश घेतला आणि आपल्या कारकीर्दीला सुरूवात केली. १९७५ मध्ये आलेल्या अपूर्व रागड्गल चित्रपटातून त्यांनी सुरूवात केली आणि तो चित्रपट राष्ट्रीय पारितोषिक विजेता ठरला.
१९५० मध्ये बेंगळूर येथील मराठा हेंद्रे पाटील यांच्या कुटुंबियात त्यांचा जन्म झाला. शिवाजीराव गायकवाड असं त्यांचं पूर्ण नाव. आई जिजाबाई आणि रामोजीराव गायकवाड हे त्यांचे आई वडील. १९८१ मध्ये त्यांचा विवाह रंगाचारी यांच्याशी झाला. रजनीकांत यांना दोन मुली आहेत. रजनीकांत यांनी मागील निवडणूकीत नरेंद्र मोदी यांच्याबरोबर चर्चा केली होती. मात्र त्यावेळी त्यांनी कोणताही पक्षाची घोषणा केली नव्हती.
-एएनआयवरून
तेला आपला वाटणारा, हक्काचा असा अभिनेता. आता तो राजकारणात प्रवेश करतो आहे. तशी घोषणा त्यांनी काही दिवसापूर्वी केली आहेच. ते इतर कुठला राजकीय पक्षात प्रवेश करणार नाहीत तर आपला स्वतंत्र पक्षच काढणार आहेत.
दक्षिण भारतातील सामान्य माणसांना रजनीकांत म्हणजे देव वाटतो. चित्रपटातील अनेक स्टाईल त्याच्या प्रसिध्द आहेत.
एकादा सामान्य कारपेंटर दक्षिणेतील सुपरस्टार बनला या गोष्टीवर खुद्द रजनीकांतसुध्दा कधी विश्वास ठेवणार नाही. मात्र तसे रजनीकांतच्या आयुष्यात झाले आहे. आजचा सुपरस्टार रजनीकांत सार्यांना दिसत असला तरी तो काही एका दिवसात घडला नाही, किंवा एका सिनेमानंतर तो लगेच सुपरस्टार झाला असं झालं नाही, कधी बस कंटक्टर, कधी कारपेंटर तर कधी मिळेल ते काम करून रजनीकांत सुपरस्टार झाला आहे.
नाटक, सिनेमांची आवड रजनीकांत यांना होतीच, मात्र त्यावेळी त्यांना पैशाचीही टंचाई होती. या सगळ्यात त्यांनी कधी आपल्यातला कलाकार मरू दिला नाही. पैशाची चणचण असतानाही त्यांनी मग मद्रासच्या फिल्म इन्सिट्यूटमध्ये प्रवेश घेतला आणि आपल्या कारकीर्दीला सुरूवात केली. १९७५ मध्ये आलेल्या अपूर्व रागड्गल चित्रपटातून त्यांनी सुरूवात केली आणि तो चित्रपट राष्ट्रीय पारितोषिक विजेता ठरला.
१९५० मध्ये बेंगळूर येथील मराठा हेंद्रे पाटील यांच्या कुटुंबियात त्यांचा जन्म झाला. शिवाजीराव गायकवाड असं त्यांचं पूर्ण नाव. आई जिजाबाई आणि रामोजीराव गायकवाड हे त्यांचे आई वडील. १९८१ मध्ये त्यांचा विवाह रंगाचारी यांच्याशी झाला. रजनीकांत यांना दोन मुली आहेत. रजनीकांत यांनी मागील निवडणूकीत नरेंद्र मोदी यांच्याबरोबर चर्चा केली होती. मात्र त्यावेळी त्यांनी कोणताही पक्षाची घोषणा केली नव्हती.
-एएनआयवरून
No comments:
Post a Comment